Thursday, August 30, 2012

एक गुलझार प्रतिक्रिया!



माझ्या एका खास मित्राची ही एक 'गुलझार' प्रतिक्रिया!

तुझ्या गुलझार लेखमालेच्या निमित्ताने एक प्रसंग आठवला.

" माझ्यासारखाच बालपण वसईत जगलेला वसईकर एका प्रकल्पावर सतत भेटत असे. एकदा म्हणाला की तुला वसईत जाऊन स्थाईक व्हावेसे वाटत नाही का? प्रश्न वाटतो तेवढा सरळसोट नव्हता. कळले नाही की तो प्रश्न बालपणाविषयी आहे की वसईविषयी आहे? नंतर जाणवले की बालपण तर कधीच संपले आणि ज्या वसईशी बालपण जोडले आहे ती वसई. ती ही ती राहिली नाही. विचार गद्यात करणे कठीण वाटू लागले. आणि माझ्यातला गुलझार जागा झाला.

बालपणाबरोबर हरवलेली वसई .......
झुळझुळणारे वारे होते, मतलई तर कधी खारे होते

बिदीत पकडलेले मासे तर जिवापेक्षा प्यारे होते
त्या काळात सण होते, गावात आपलेपण होते

निवांत असे क्षण होते, शाळेत बालपण होते
मैत्री प्रेमाचे बंध होते, निश्शब्द अदृश्य गंध होते

सोपे साधे छंद होते, क्षितिजावरचे वास्तव मात्र बेबंद होते
यथावकाश बदलले सारे, झुळझुळणारया वार्याच्या वेगाने
अजूनही आठवते सारे, हळहळणारया स्वप्नाच्या आवेगाने......

No comments:

Post a Comment